जोडधंद्याशिवाय शिक्षक नाही, भ्रष्टाचाराशिवाय अधिकारी नाही-राजन गवस
schedule14 Jun 25 person by visibility 321 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : . ‘शिक्षणातून चांगला माणूस घडविण्याची प्रकिया झाली पाहिजे. पण सध्याच्या शिक्षण पद्धतीतून माणूस घडण्याची प्रक्रिया थांबली आहे. शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांनी ज्या उदात्त हेतूने शिक्षण सामान्यापर्यत पोहोचविण्याचे कार्य केले. तो उद्देश आजच्या व्यवस्थेने बाजूला सारला आहे. काही तत्वनिष्ठ शिक्षक आहेत, प्रामाणिक अधिकारी आहेत पण इतरांचे काय ? सध्या जोडधंद्याशिवाय शिक्षक नाही आणि भ्रष्टाचाराशिवाय अधिकारी नाही. जो संस्थाचालकांच्या मर्जीतील, चाटूगिरी करणारा तो प्राचार्य अशी विचित्र अवस्था बनली आहे.’ असे परखड साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी व्यक्त केले.
विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या ६ लाख वह्यांचे वाटप, आज शनिवारी ज्येष्ठ साहित्यक डॉ.राजन गवस यांच्या हस्ते करण्यात आलं. शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला. राजर्षी शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम झाला.
‘एक चांगला माणूस घडवणाऱ्या शिक्षणाची सद्या गरज आहे. मुलांना समर्थ बनवा. मोबाईलच्या अतिवापरापासून मुलांना दूर ठेवा, एक दिवस मोबाईलचा उपवास करा. पालकांनी यासाठी काही आचारसंहिता पत्करायला हवी. कारण वडिल चोवीस तास रिल्स बघण्यात मग्न आणि यूटयूबवर पाहून स्वयंपाक करणारी आई अशी स्थिती असताना ते मुलांना कोणत्या अधिकारवाणीने मोबाइलपासून लांब ठेवणार ? असा सवाल गवस यांनी केला. नकार पचवायची शक्ती मुलांच्यामध्ये तयार करा. मातृभाषेतूनच मुलांना शिक्षण मिळायला हवे. पहिलीपासून स्पर्धा हे कसले शिक्षण ? मुलांना मैदानावर मुक्तपणे खेळू दे, संगीत शिकू दे, चित्रे काढू दे’असे त्यांनी नमूद केले.
आमदार सतेज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वह्या म्हणजे, गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी, ही मदत आभाळा इतकी मोठी आहे. या वह्या विद्यार्थ्यांच्या मनात अनेक स्वप्न तयार करतात. वही स्वरुपी या मदतीतून, लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागत आहे. संवेदनशील नेतृत्व म्हणून, आमदार सतेज पाटील यांचा हा उपक्रम अनुकरणीय आहे.’असे गौरवोद्गार गवस यांनी काढले.
आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘ राजकारण आणि समाजामध्ये काम करत असताना चांगल्या गोष्टी लोकांसमोर ठेवणे हे आपलं कर्तव्य समजून वाढदिवसाच्या निमित्तान वह्या संकलनाचा उपक्रम सुरू केल्याच त्यांनी सांगितल. आपला उद्देश प्रामाणिक असेल तर त्याला यश देखील मिळत असते. त्यानुसार, वाढदिवसानिमित्त दरवर्षी लाखो वह्या संकलित होत आहेत. वाढदिवसानिमित्त संकलित झालेल्या वह्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळामध्ये वाटप करण्याकरीता जाताना कार्यकर्त्यांनी मोबाईलचा वापराबाबत विद्यार्थ्यांच्यामध्ये प्रबोधन करावे.’
कार्यक्रमाला माजी महापौर वंदना बुचडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे संचालक शशिकांत पाटील चुयेकर, बाबासाहेब चौगुले, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, माजी उपमहापौर विक्रम जरग, संजय मोहीते, प्रकाश पाटील, सुलोचना नायकवाडे, माजी नगरसेविका भारती पोवार, स्थायी समितीचे माजी सभापती राजेश लाटकर, सुनिल मोदी, संदीप नेजदार, बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर, माजी नगरसेवक प्रविण केसरकर, राहूल माने, मधुकर रामाणे, माणिक मंडलीक , लाला भोसले,ईश्वर परमार, भूपाल शेटे, विनायक फाळके, रवी आवळे, मोहन सालपे, शशिकांत पाटील, तौफीक मुल्लणी, प्रकाश चौगले, दुर्वास कदम, शिवानंद बनछोडे, रियाज सुभेदार, राजू साबळे, बबन रानगे, सुयोग मगदूम, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उत्तम आंबवडे, संग्राम पाटील, सचिन चौगुले, शिक्षक संघटनेचे भरत रसाळे, मोहन भोसले, विलास साठे, सुधाकर सावंत, उमेश देसाई, आदी उपस्थित होते.