तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष विलास पाटील यांचे निधन
schedule15 Jun 25 person by visibility 214 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : वळसंग येथील प्रतिष्ठीत नागरिक व तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष विलास यशवंत पाटील यांचे अल्पशा आजाराने रविवारी (१५ जून २०२५) निधन झाले. मृत्यूसमयी ते 81 वर्षाचे होते. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उत्कृष्ट काम केले होते. विविध तंटे त्यांनी सामज्यंसाने सोडविले. गावात एकोपा राहावा म्हणून कायम प्रयत्नशील असायचे. विविध कार्यक्रम, सामाजिक समारंभात सहभाग असायचा. त्यांच्या तंटामुक्त अध्यक्षपदाच्या कालावधीत वळसंग ग्रामपंचायतीला तंटामुक्तीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांनी, २००८ ते २०२२ या कालावधीत तंटामुक्त अध्यक्ष म्हणून चौदा वर्षे काम केले. वळसंग ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा नुकताच झाला. या समारंभात त्यांना, उत्कृष्ट सामाजिक कार्याबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अनिल पाटील यांचे ते वडील होतं.