Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर इन्वेस्टर्स असोसिएशनतर्फे शनिवारी -  रविवारी मार्गदर्शन कार्यक्रमजिप प्रशासनाची कारवाई, विस्तार अधिकारी- कनिष्ठ सहाय्यक निलंबितस्थायीच्या सभेत आरोग्य विभागाच्या संथगतीच्या कामकाजाचा पंचनामा, विन्सोल कंपनी ब्लॅकलिस्टकोल्हापूरकरांचा प्रवास होणार वातानुकूलित बसमधून, सुरक्षित अन् सुखकर ! केएमटीच्या ताफ्यात ई बसेस दाखल, सप्टेंबरपासून प्रवाशांच्या सेवेत ! !३०० गर्भपात, माजी सिवहिल सर्जन पोलिसांच्या ताब्यात ! कोल्हापुरात हॉस्पिटलवर धाड !!ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगी गावडेंच्या जयंतीनिमित्त सोळांकूरमध्ये 'न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल' शाखेचे उदघाटन शेतकरी कर्ज आणि वीज बिल माफीमुळे बळीराजा आर्थिक संकटातून बाहेर शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांनी ज्ञानज्योती प्राचार्या शुभांगी गावडे यांची जयंती साजरीजिल्हा परिषद सदस्य एकवटले, अध्यक्षांना दिले निवेदन ! स्थायीच्या सदस्यांचीही साथ !!माझ्याशी वाकडं- नदीवर लाकडं ! आयुक्तांच्या विधानाची नगरसेवकांनी केली मंत्र्यांच्याकडे तक्रार !!

जाहिरात

 

जैन मुला -मुलींसाठी राज्यात सोळा वसतिगृहे उभारणार, कोल्हापुरात प्रशासनाकडे जागेची मागणी -ललित गांधी

schedule30 Jul 26 person by visibility 192 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : देशात, राज्यात अत्यंत अल्पसंख्यांक असणाऱ्या जैन समुदायातील विद्यार्थ्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहासाठी आणण्यासाठी आपला प्रयत्न राहील. राज्यातील आठ जिल्ह्यात केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने जैन मुला-मुलींचे प्रत्येकी 1 याप्रमाणे 16 वसतिगृह उभारण्यात येणार आहेत. कोल्हापुरातही येत्या आर्थिक वर्षाअखेर या वसतीगृह उभारणीला प्रारंभ होईल. त्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे दोन एकर जागा मागितली आहे. प्रतिपादन जैन अल्पसंख्यांक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी केले.
   जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली जैन समुदायाच्या विविध प्रश्नांच्या अनुषंगाने आज आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. ते पुढे म्हणाले,  जैन समुदायातील मुलांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी मदत होईल.जिल्ह्यात या समुदायाची 8-क तर 3- ब वर्गाची तीर्थक्षेत्र असून यांच्या विकासाकरिता शासन अनुकूल आहे . समाजाच्या विकासासाठी शासनाकडून मिळणारा निधी हा समाजाच्या पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने खर्च करण्याला आपले प्राधान्य असेल. या अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता नसल्याचे ते म्हणाले .
         जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड म्हणाले,जैन समुदायाच्या विकास विषयक कामांचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनाकडे सादर करण्यात येतील. जिल्ह्यात ज्या गावात जैन समुदायाच्या लोकांची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी पोलीस विभागाने शांतता कमिटीत जैन समुदायातील लोकांना स्थान द्यावे. त्याचबरोबर तीर्थक्षेत्र विकास निधीतून स्थानिक तीर्थक्षेत्रामध्ये लोकपयोगी कामे करण्याला जिल्हा प्रशासनाचे प्राधान्य असेल.
        जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ जॅसमीन यांनी जैन समुदयासाठी महिला व बाल विकास विभागातर्फे(एकात्मिक बाल विकास सेवा योजना) राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली.     या बैठकीत जैन धर्मियांना येणाऱ्या विविध अडचणींचा सामना उपस्थित प्रतिनिधींनी यावेळी सांगितला. याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख, शहर अभियंता रमेश मस्कर जिल्हा अग्रणी बँकेचे उपस्थित होते .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes