Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
णण तततढढ तय नवीन आलेल्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेची कार्यपद्धती अवलंबणे गरजेचे, निष्ठेला योग्य न्याय मिळतोजिल्हा परिषदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरीकोल्हापुरात पंधरा एप्रिलपासून तीन दिवसीय बसव व्याख्यानमालाविविध उपक्रमानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी कंपनी सचिव म्हणून प्रशासनासह खासगी कंपन्यातही करिअरच्या मोठया संधी - पवन चांडककेआयटीच्या आदित्य साळुंखेस २७ लाख ५० हजाराचे पॅकेज ! बेट्टी ब्लॉक्स आंतरराष्ट्रीय कंपनीत निवड !!  काँग्रेसमध्ये घराणेशाहीला ब्रेक ! पदाधिकारी बदलात नव्या चेहऱ्यांना संधी !!बाजार समितीच्या तीन संचालकांना भाडेकरार भोवणार ? जिल्हा उपनिबंधकानी मागवली माहिती

जाहिरात

 

कोल्हापुरात पंधरा एप्रिलपासून तीन दिवसीय बसव व्याख्यानमाला

schedule15 Apr 26 person by visibility 38 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महात्मा बसवेश्वर यांची जयंती १९ एप्रिल २०२६ रोजी साजरी होत आहे. त्यानिमित्त शिवाजी विद्यापीठातील शरण साहित्य अध्यासन आणि बसव केंद्र, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवसीय बसव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते १७ एप्रिल २०२६ या कालावधीत  दसरा चौक येथील शाहू स्मारक भवन येथे राज सायंकाळी सहा वाजता व्याख्याने होणार आहेत. १५ एप्रिल रोजी विजयपूर येथील प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील यांचे 'वचन साहित्य एक समृद्ध भारतीय ज्ञान परंपरा' या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी प्राचार्य डॉ. दत्ता पाटील अध्यक्ष म्हणून उपस्थित राहतील. १६ एप्रिल रोजी निवृत्त सनदी अधिकारी इंद्रजीत देशमुख यांचे 'अमृतानुभवातील चिंतन' या विषयावर व्याख्यान आहे.याप्रसंगी प्राचार्य डॉ. जी. पी. माळी अध्यक्षस्थानी असतील. १७ एप्रिल रोजी 'शरण संकुल आणि सत्यशोधक समाज' या विषयावरती धनाजी गुरव मांडणी करणार आहेत यावेळी भारती पाटील अध्यक्षस्थानी असतील. या व्याख्यानमालेचा सर्वांनी लाभघ्यावा असे आवाहन शरणसाहित्य अध्यासनाच्या समन्वयक प्रा. डॉ. तृप्ती करेकट्टी तसेच बसव केंद्र कोल्हापूरचे विश्वस्त सरला पाटील आणि राजशेखर तंबाके यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes