Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
चित्रकाराची शिवभक्ती, चित्रातून उलगडला शिवछत्रपतींचा इतिहास !जोतिबा मंदिर विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सरकार पाठीशी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसग्रंथपाल - शारीरिक शिक्षण संचालकपदाच्या भरतीसाठी प्राचार्य असोसिशनने घेतली मंत्र्यांची भेटबीबीए, बीसीएसाठी पुन्हा प्रवेश परीक्षा होणार- मंत्री चंद्रकांत पाटील यांची अधिकाऱ्यांना सूचनाशिक्षकांचा प्रशिक्षणामधील अनुपस्थितीचा कालावधी क्षमापित करावा : भरत रसाळेगोकुळच्या राजकारणात महादेवराव महाडिकांची एंन्ट्री, निवडणुकीसाठी ठोकला शड्डू ! सत्ताधारी नेतृत्वावर डागली तोफ !गोकुळचे  चेअरमन-संचालकांनी घेतली अजित पवारांची भेट, दुग्ध व्यवसायसंबंधी चर्चा !!जेईई अॅडव्हान्स परीक्षेत विवेकानंद  कॉलेजचे यश महापालिका निवडणुकीसाठी भाजपा मैदानात, ८१ प्रभागात नागरिकांसाटी शिबिरेभालकर्स कला अकादमीचे पुरस्कार जाहीर ! अनिल वेल्हाळ, सतीश रणदिवे, दिलीप बापट, प्रवीण कोडोलीकरांचा समावेश !!

जाहिरात

 

गोकुळचे  चेअरमन-संचालकांनी घेतली अजित पवारांची भेट, दुग्ध व्यवसायसंबंधी चर्चा !!

schedule04 Jun 25 person by visibility 107 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गोकुळ केवळ दुग्ध उत्पादक संस्था नसून ती शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याची मजबूत यंत्रणा आहे. त्यांच्या व्यवसायाचा विस्तार म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार याने केले. गोकुळचे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उपमुख्यमंत्री पवार यांची सदिच्छा भेट घेतली. गोकुळ परिवाराच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे आणि संघाचे संचालक मंडळ, अधिकारी उपस्थित होते. सहकारमंत्री पाटील यांचा गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 गोकुळच्यावतीने मुंबईतील राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळच्या जागेची मागणी करण्यात आली.उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सरकारकडून् आवश्यक ती मदत नक्की केली जाईल. तसेच राज्य सरकारकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या गाय दूध अनुदान तत्काळ वितरित करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या.चेअरमन नाविद मुश्रीफ यांनी गोकुळचा उद्देश नेहमीच शेतकरी हित आणि संस्थेचा सक्षम विस्तार हा राहिला आहे. उपमुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन आमच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल.असा आशावाद व्यक्त केला. संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, वाशी शाखा डेअरी व्यवस्थापक दयानंद पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes