Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
हाज यात्रेकरुंचे कोल्हापूर विमानतळावर स्वागततज्ज्ञ डॉक्टरांचे शनिवारी ओळख मधुमेहाची याविषयी मार्गदर्शनप्रधानमंत्री आवासमध्ये कोल्हापूर जिल्हा परिषदेला तृतीय क्रमांक, शनिवारी पुण्यात पुरस्कार वितरणअभिनेते अरुण सरनाईक यांच्यावर माहितीपट, रविवारी प्रीमियअर शोश्री महालक्ष्मी अन्नछत्रचा राष्ट्रीय पातळीवर सन्मान, भारत सरकारकडून प्रमाणपत्र प्रदानसलग दुसऱ्यांदा एटी स्पोर्ट्स लिंगायत प्रीमिअर लीगचा मानकरी ! बॅटरी पॉवर सोल्युशन्स उपविजेते !!कुलगुरुनंतर पुढे काय ? या प्रश्नावर डी. टी. शिर्के म्हणाले माझ्यासमोर एक मोठा....जिपमध्ये आता जीपीएफ ऑनलाइन, मोबाइल अॅपद्वारे कळणार प्रॉव्हिडंड फंडाचे स्टेटससंशोधकांनी जिथे समस्या आहेत त्या ठिकाणी संशोधनाला प्राधान्य द्यावे-डॉ. अभय बंगशहरातील वाहतूक-पार्किंगला शिस्त लागणार, सुट्टीच्या दिवशी शाळांच्या मैदानावर पे अँड पार्क !

जाहिरात

 

हद्दवाढीला विरोधच, वीस गावात  बंद ! इंचभरही जमीन महापालिकेला देणार नाही !!

schedule17 Jun 25 person by visibility 64 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रस्तावित हद्दवाढीच्या विरोधात कोल्हापूर शहरालगतच्या वीस गावात मंगळवारी (१७ जून २०२५) कडकडीत बंद पाळला. गावातील सर्व व्यवहार बंद होते. प्रमुख चौकात एकत्र येत ग्रामपंचायत सदस्यांनी हद्दवाढीला विरोध कायम राहील असा इशारा दिला. सरकारने, ग्रामीण भागातील जनतेच्या विरोधात जाऊन निर्णय घेतला तर आगामी स्वानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर बहिष्का टाकू. हद्दवाढीच्या विरोधात लढत राहू, एक इंचभरही जमीन महापालिकेला देणार नाही असा निर्धार हद्दवाढ विरोधी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

पाचगाव, कळंबा, मोरेवाडी, उचगाव, गडमुडशिंगी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, गांधीनगर, वळीवडे, पीरवाडी,  आंबेवाडी, नागदेववाडी, शिये, नागाव, गोकुळ शिरगाव, पुलाची शिरोली, कळंबे तर्फे ठाणे, बालिंगा, वडणगे, शिंगणापूर या गावात बंद पाळण्यात आला. सकाळपासूनच गावातील सर्व दुकाने बंद होती. हद्दवाढीला विरोध दर्शविणारे फलक प्रमुख चौकात उभारले होते. वीस गावातील बंदच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त लावला होता. पुलाची शिरोली येथे काही तरुणांनी हद्दवाढीच्या विरोधात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. ‘शोले’ सिनेमा स्टाइल झालेल्या आंदोलनामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. प्रशासनाची धावपळ झाली. पोलिसांनी, हस्तक्षेप केल्यानंतर तरुण पाण्याच्या टाकीवरुन उतरले. हा प्रकार वगळता वीस गावात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. दिवसभर बंद पाळण्यात आला.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes