Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
खडके अकॅडमी बोरपाडळेचा दहावीचा सलग अकराव्या वर्षी शंभर टक्के निकालआबिटकर इंग्लिश मिडीयम स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्केनूतन मराठी विद्यालयचा दहावीचा निकाल ८१ टक्केप्रकाश बेलवाडेंवर हल्ल्याचा प्रयत्न, एक जण जखमीकोल्हापूर विभाग राज्यात द्वितीय ! तीन जिल्ह्यातील ९२८ शाळांचा निकाल शंभर टक्के ! !अशोक गाडे, दुग्धचे उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्यावर कारवाईची मागणीयंग सिनीअर्सची रंग-रेषांची दुनिया ! शाहू स्मारक भवनमध्ये चित्र प्रदर्शन !! सत्तेत असताना सतेज पाटलांनी काय केले, आता आंदोलनाची नाटके कशासाठी – आमदार राजेश क्षीरसागरव्ही. बी. पाटलांचे मंत्री मुश्रीफांच्यावर गंभीर आरोप, भैया मानेंचा पलटवारद्रूतगती महामार्गावर ई चलनद्वारे बसधारकांची आर्थिक लूट, प्रदीप राठोडांचे सोमवारपासून आमरण उपोषण

जाहिरात

 

सत्तेत असताना सतेज पाटलांनी काय केले, आता आंदोलनाची नाटके कशासाठी – आमदार राजेश क्षीरसागर

schedule07 May 26 person by visibility 65 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सत्तेत असताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूरच्या विकासासाठी काही केले नाही. केवळ मिळवायचे काम केले. आणि आता ते पाण्यासाठी आंदोलनाची नाटके करत आहेत.’अशी बोचरी टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील तेरा गावातील जलजीवन योजनेचे काम रखडल्याच आरोप करत काँग्रेसतर्फे गुरुवारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चात महायुती सरकारवर टीका करण्यात आली. या आंदोलनावरुन आमदार क्षीरसागर यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. आमदार पाटील यांच्याकडे महापालिकेची सत्ता होती, जिल्हा परिषदेत सत्ता होते. ते जिल्हयाचे पालकमंत्री होते. या कालावधीत त्यांनी शहरासाठी काय केले ?  आणि आता मोर्चा  काढतात. आंदोलनाची नाटके कशासाठी ? मोर्चा कोण काढते ? त्यांना विकासकामे करायला कुणी अडवले होते का ?असा सवालही क्षीरसागर यांनी केला.  

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes