Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शेतकरी संघाचा खत कारखाना सुरू होणार, अध्यक्षांची अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत चर्चाहायकोर्टाच्या स्थगितीनंतरही कोल्हापुरात संच मान्यतेची प्रक्रिया ! शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी भेटणार शिक्षणाधिकाऱ्यांना !!मिस चायवाली ! रोटरी सेंट्रलकडून शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ !!पणदूरकर दाम्पत्याच्या दातृत्वाची, पुनर्पर्चिती  ! भारतीय संरक्षण निधीसाठी पाच लाखाची देणगी !!अंबाबाई मंदिर विकास आराखड्याला निधी मिळाल्याबद्दल भाजपचा आनंदोत्सव, मंदिरात पेढे वाटप लेखकाच्या आयुष्याची अनसुनी कहाणी रुपेरी पडद्यावर ! पायवाटाची सावली २३ मे रोजी प्रदर्शित !!मंदिर विकास आराखडयामुळे जि्ल्हयाच्या विकासाला गती, भाविकांना सोयी सुविधाविवेकानंद कॉलेज हे गुणवत्तेचे मानदंड - प्राचार्य अभयकुमार साळुंखे सुप्रीमच्या आदेशाचे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांना संधी मिळणारअंबाबाई मंदिर विकास आराखडा १४४५ कोटीचा, जोतिबा विकास आरखडयासाठी २५९ कोटीचा

जाहिरात

 

मंदिर विकास आराखडयामुळे जि्ल्हयाच्या विकासाला गती, भाविकांना सोयी सुविधा

schedule07 May 25 person by visibility 168 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर विकासासाठी १४४४ कोटी रुपयांचा तर जोतिबा मंदिर विकाससाठी २५९ कोटीहून अधिक रुपयांचा विकास आराखड्याला राज्य सरकारने मंजुरी दिली. मंदिर विकास आराखडयाला मंजुरी मिळाल्याने भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्याीतील नेते मंडळींनी राज्य सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करत यामुळे जिल्हयाच्या विकासाला गती मिळेल अशा भावना व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर – करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर व जोतिबा मंदिर विकास आराखडयाला मंजुरी हा जिल्हयासाठी मोठा निर्णय आहे. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन व विकास कार्याला गती मिळणार आहे. जिल्हा प्रशासनाने दोन्ही मंदिरांसाठी सखोल अभ्यास करून आवश्यक व प्राधान्य कामांचा समावेश करत उपयुक्त आराखडा तयार केला आहे. हे सर्व राज्यातील भाविकांसाठी आनंददायक ठरणार आहे.’

  वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ - हे दोन्ही तीर्थक्षेत्र आराखडे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर झाल्याचा मला फार मोठा आनंद झालेला आहे. या दोन्हीही तीर्थक्षेत्रांचे आराखडे हे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या भक्ती आणि अस्मितेची प्रतीके आहेत. सबंध जिल्ह्याचे या दोन्हीही प्रकल्पांकडे लक्ष लागून राहिलेले होते. मी पालकमंत्री असताना या दोन्हीही तीर्थक्षेत्रांच्या आराखड्यांची आम्ही सुरुवात केली होती. नंतर पालकमंत्री  आबिटकर आणि सहपालकमंत्री  माधुरी मिसाळ यांनी त्यामध्ये काही भर घातली. 

  खासदार धनंजय महाडिक - महायुती सरकारकडून वचनपूर्ती, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामुळे कोल्हापूरच्या पर्यटन आणि आर्थिक विश्वाला मिळणार बूस्टर डोस मिळणार आहे. गेली अनेक वर्ष कोल्हापूरच्या नागरिकांकडून या दोन्ही तीर्थक्षेत्र विकास आराखड्याची मागणी केली जात होती. कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा आणि श्रद्धेचा विषय असलेल्या या मागणीला राज्यातील महायुती सरकारने मूर्त रूप देण्यासाठी पाऊल उचलले आहे. समस्त कोल्हापूरकरांच्या दृष्टीने राज्य सरकारने उचललेले हे पाऊल  स्वागतार्ह आणि समाधानकारक आहे.

 राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर - करवीर निवासिनी अंबाबाई म मंदिरात भाविकांना सोयी सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने विकासात्मक पावले उचलणे गरजेचे आहे. याकरिता मंदिर परिसराचा तीर्थक्षेत्र पुर्नविकास आराखडा आज मंत्रिमंडळात सादर करण्यात आला. हा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. कोल्हापूरसाठी अंत्यत महत्वाचा निर्णय झाल्यामुळे राज्य सरकारचे करवीरवासीयांच्यावतीने आभार मानत आहे.

 आमदार अमल महाडिक - लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या या दोन्ही देवस्थानांच्या विकासासाठी मी सातत्याने प्रयत्न करीन. दक्षिण काशी ही कोल्हापूरची ओळख आता आणखी दृढ होईल यात शंका नाही. अंबाबाई मंदिर आणि ज्योतिबा मंदिर परिसराच्या जीर्णोद्धारासह, भूसंपादन, दर्शन मंडप उभारणी आणि इतर अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. १४४५ कोटी रुपयांच्या निधीतून दक्षिण काशीच्या नव्या रूपाचा श्रीगणेशा होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes