हायकोर्टाच्या स्थगितीनंतरही कोल्हापुरात संच मान्यतेची प्रक्रिया ! शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी भेटणार शिक्षणाधिकाऱ्यांना !!
schedule07 May 25 person by visibility 620 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संच मान्यतेबाबत काढलेला आदेश अन्यायकारक आहे. यामुळे राज्याती अनेक शाळा बंद पडतील. हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार असून अनेक शाळांना मुख्याध्यापक मिळणार नाहीत. या आदेशास नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. त्या स्थगितीनुसार कोल्हापूर जिल्ह्यात चालू असलेली संच मान्यता त्वरीत स्थगित ठेवावी यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व जिल्हा मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना निवेदन देण्यात येणार आहे. ९ मे २०२५ रोजी सकाळी अकरा वाजता शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार आहे. यासंबंधी नियोजनासाठी मुख्याध्यापक संघाच्या विद्याभवन येथे बैठक झाली. मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. शैक्षणिक व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सभा झाली. या सभेस शिक्षक नेते दादासाहेब लाड, बी. जी. बोराडे, सचिव आर. वाय. पाटील, अनिल लवेकर, भरत रसाळे,प्रा.सी एम. गायकवाड, सुधाकर निर्मळे, राजेश वरक, इरफान अन्सारी, श्रीकांत पाटील, संजय पाटील, उदय पाटील, एम. जे. पाटील, एस. के.पाटील, पंडीत पवार, शिवाजी भोसले, एच. वाय. शिंदे, हेमंत धनवडे, बाजीराव साळवी, मदन निकम उपस्थित होते.