Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केएमटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी ! नगरविकासचा आदेश !!तिरुपती बालाजी येथे महाराष्ट्र सदन स्थापन करा, राजेश क्षीरसागरांची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणीबदली टप्पा क्रमांक सहामधील शिक्षकांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा २१ ऑगस्टपासून कोल्हापुरात  बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजनसहाय्यक प्राध्यापक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत लवकरच प्रक्रिया-मंत्री चंद्रकांत पाटील न्यू वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नेत्ररोग तपासणी शिबिरकोल्हापुरात 19 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय वीज परिषद, वीज दरवाढीच्या विरोधात ठरणार आंदोलनाची दिशाकॉमर्स कॉलेजमध्ये डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरीगोकुळ करणार आईस्क्रिम अन् चीज निर्मिती ! गडहिंग्लजला उभारणार म्हैस विक्री केंद्र !!शिक्षक संघ थोरात गटाची कोल्हापूर शहर कार्यकारिणीची घोषणा

जाहिरात

 

राष्ट्रवादी काँग्रेस हा फिनिक्स पक्षाप्रमाणे, चाल कासवाची पण महापौर राष्ट्रवादीचाच होईल

schedule11 Aug 25 person by visibility 113 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन: "  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आहे. कोल्हापूर महापालिकेच्या अनेक निवडणुकांमध्ये आम्ही दुसऱ्या स्थानावर आलो आहोत. आम्ही महापौर, स्थायी समिती सभापती पद अशी सगळी पद घेतली आहेत. यावेळीसुद्धा महापौर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा होणार. आमची कासवाची चाल आहे," असे असे राष्ट्रवादीचे नेते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन  मुश्रीफ यांनी सांगितले. कोल्हापुरात पत्रकाराशी ते बोलत होते
         निवडणूक आयोगानेच मतचोरी केल्याची तक्रार अनेक दिवसापासून राहुल गांधी मांडत आहेत. या प्रश्नावर मंत्री  मुश्रीफ म्हणाले, या संदर्भात निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या मुद्यांचे खंडन केले आहे. वास्तविक;  पराभव हा पराभव असतो. तो पचवायचीही ताकद लागते. निवडणुकांमध्ये कच्च्या मतदाराच्या लोकांसमोर येत असतात. त्यावर हरकतीही मागवल्या जात असतात. कोल्हापूर जिल्ह्यात एकही उमेदवार असं झालेलं आहे, असं म्हणायला  तयार नाही. 
         शरद पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटाबाबत विचारले असता मंत्री  मुश्रीफ  म्हणाले, याबद्दल तर मला खरोखरच आश्चर्य वाटते. त्या व्यक्तींची नावे, पत्ते, फोन नंबर तरी लिहून ठेवले असतीलच की पवारसाहेबांनी. त्यांना विचारायला हवं होतं की, हे कसं करून देणार आहात? विधानसभा निवडणूक होऊन आजघडीला नऊ महिने होऊन गेले आणि पवारसाहेब ही गुगली आता टाकत आहेत.  आज संजय राऊतही म्हणत आहेत, की असे लोक येऊन गेले. अशा कपोलकल्पित गोष्टी सांगून लोकांचे फक्त मनोरंजनच होईल. 
           उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने कलंकित मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाका, असा आरोप करीत आज राज्यभर मोर्चे काढलेले आहेत. या प्रश्नावर मंत्री  मुश्रीफ म्हणाले, जे आरोप आहेत ते सिद्ध व्हावे लागतात. उच्च न्यायालये, सर्वोच्च न्यायालय त्यासाठी आहे.
          सर्किट बेंच तयारीची पाहणी करणाऱ्यांमध्ये तुम्ही दिसत नाही, या प्रश्नावर मंत्री  मुश्रीफ म्हणाले,  मी काही पाहणी करायला जाणार नाही. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाची कार्यक्रम आचारसंहिता वेगळी असते. ज्यावेळी हे कोल्हापूरचे जिल्हा न्यायालय बांधले त्यावेळी तत्कालीन माननीय उच्च न्यायाधीशानी मला बोलावून घेतले. त्यांनी सांगितले की, या इमारतीचा सर्वोत्कृष्ट प्लॅन तुम्ही केलेला आहे. परंतु; सगळ्या जिल्ह्यातून अशी मागणी पुढे आली तर त्या इमारती बांधाव्या लागतील. त्यानुसार ही जिल्हा न्यायालय इमारत ज्यावेळी बांधण्यात आली, त्यावेळी ती सर्वोत्कृष्ट जिल्हा न्यायालयाची इमारत ठरली.  आता तो टाईप प्लॅन म्हणून सर्व राज्यभर राबविण्यात येणार आहे

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes