Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
अंबाबाई मंदिर विकास आराखडा १४४५ कोटीचा, जोतिबा विकास आरखडयासाठी २५९ कोटीचाबार असोसिएशनमध्ये गटतट न आणता खंडपीठाचा लढा यशस्वी करू – नूतन पदाधिकारी-कार्यकारिणीकडे पदभार सुपूर्दस्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचा आदेशटॉप वीस शिक्षकांमध्ये पदवीधर शिक्षिका अर्चना सुतार, कविता सरदेसाई !कुशिरेच्या ज्योती चव्हाणचे बारावी परीक्षेत लख्खं यशबारावी परीक्षेत विवेकानंद कॉलेजच्या गुणवत्तेची परंपरा कायमगोखले कॉलेजचा बारावीत विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्केप्रशासनाची अॅक्शन, प्रदीप हुपरे निलंबित ! सदाशिव येजरेंचा कबुलीनामा !!शिवाजी विद्यापीठासाठी नव्या कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात, शोध समितीसाठी नावांची शिफारसचंद्रकांत पाटील ॲक्शन मोडवर, शिक्षण सहसंचालक कार्यालयांची तपासणी होणार ! कामत समितीची स्थापना !!

जाहिरात

 

कोरे अभियांत्रिकीमध्ये ३०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

schedule27 Apr 25 person by visibility 78 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (ऑटोनॉमास) अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाचा गुण गौरव समारंभ उत्साहात झाला. या कार्यक्रमात ३०० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. या वर्षीचा बेस्ट आउटगोइंग स्टुडेंट होण्याचा मान तनिषा शिंदे हिने पटकावला.

वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष, डॉ. विनय कोरे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मयुरा ग्रुपचे कार्यकारी संचालक रवी डोल्ली उपस्थित होते. त्यांनी मनोगतात उद्योजक होण्याचा संस्मरणीय व प्रेरणादायक प्रवास सांगितला. तसेच महाविद्यालयाचे शिक्षण पद्धती, इमारती व व्यवस्थापनाचे विशेष कौतुक केले. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे, मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही.कारजिन्नी, यांनी उद्योग क्षमता ही आजच्या काळाची गरज असल्याचे सांगितले. 
गुणगौरव कार्यक्रमांमध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय आणि अंतिम वर्षातील रँक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला जातो. तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी घेतलेल्या परीक्षेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा गौरव केला जातो त्याच बरोबर देश पातळीवरील गेट सारख्या स्पर्धेमध्ये आपला ठसा उमटवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव या कार्यक्रमांमध्ये झाला.

महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ.बी. टी. साळोखे यांनी प्रास्ताविक केले. अधिष्ठाता, डॉ. एस. एम. पिसे यांनी कोरे अभियांत्रिकी विषयी माहिती सांगितली. यावेळी राजाराम काळे, डॉ के. आय. पाटील, प्रा. डी. बी मिरजकर, उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमाचे नियोजन डॉ. मार्क मोनिस, प्रा. गणेश कांबळे, डॉ. समाधान जाधव, प्रा. मिलींद कामत यांनी केले. तन्वी पाटील, श्रेयस श्रीराम, कृतिका पाटील, वैष्णवी पाचफुले, राजनंदिनी पाटील, ओमकुमार हिरेमठ, अदिती घाटगे, वैष्णवी भोकरे, ज्ञानदा घेवडे, प्रीतम पाटील यांनी सूत्रसंचालन केले. समन्वयक डॉ. सौ.व्ही. डी. पाटील यांनी आभार  मानले.
 

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes