Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शेतकरी संघाचा खत कारखाना सुरू होणार, अध्यक्षांची अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत चर्चाहायकोर्टाच्या स्थगितीनंतरही कोल्हापुरात संच मान्यतेची प्रक्रिया ! शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी भेटणार शिक्षणाधिकाऱ्यांना !!मिस चायवाली ! रोटरी सेंट्रलकडून शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ !!पणदूरकर दाम्पत्याच्या दातृत्वाची, पुनर्पर्चिती  ! भारतीय संरक्षण निधीसाठी पाच लाखाची देणगी !!अंबाबाई मंदिर विकास आराखड्याला निधी मिळाल्याबद्दल भाजपचा आनंदोत्सव, मंदिरात पेढे वाटप लेखकाच्या आयुष्याची अनसुनी कहाणी रुपेरी पडद्यावर ! पायवाटाची सावली २३ मे रोजी प्रदर्शित !!मंदिर विकास आराखडयामुळे जि्ल्हयाच्या विकासाला गती, भाविकांना सोयी सुविधाविवेकानंद कॉलेज हे गुणवत्तेचे मानदंड - प्राचार्य अभयकुमार साळुंखे सुप्रीमच्या आदेशाचे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांना संधी मिळणारअंबाबाई मंदिर विकास आराखडा १४४५ कोटीचा, जोतिबा विकास आरखडयासाठी २५९ कोटीचा

जाहिरात

 

बार असोसिएशनमध्ये गटतट न आणता खंडपीठाचा लढा यशस्वी करू – नूतन पदाधिकारी-कार्यकारिणीकडे पदभार सुपूर्द

schedule06 May 25 person by visibility 41 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : खंडपीठाच्या मुद्द्यावर आपण सर्व एक आहोत आणि यापुढे देखील कोणतेही गटतट  न ठेवता आपण काम करू आणि मागील ३९ वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या खंडपीठाचा लढा यशस्वी करू असा निर्धार कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनच्या बैठकीत करण्यात आला. मंगळवारी, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष व कार्यकारिणीला पदभार सुपूर्द करण्यात आला. मावळते अध्यक्ष सर्जेराव खोत यांनी नूतन अध्यक्ष पाटील यांच्याकडे पदभार सुपूर्द केला .

कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन वार्षिक निवडणूक २०२५ – २०२६ या कार्यकाळाकरिता अध्यक्ष म्हणून विजय रामचंद्र पाटील, उपाध्यक्षपदी तुकाराम पाडेकर, सचिवपदी मनोज पाटील, सहसचिवपदी सुरज भोसले, लोकल ऑडिटर  प्रमोद दाभाडे, महिला प्रतिनिधी मनीषा सातपुते आहेत. कार्यकारणी सदस्य म्हणून मीना पाटोळे, वैष्णवी कुलकर्णी, वैभव पाटील, स्वप्निल कराळे, निखिल मुदगल, प्रीतम पातले, स्नेहल गुरव, हंसिका जाधव, सम्राज्ञी शेळके आहेत. याप्रसंगी अॅड. महादेवराव अडगुळे, कल्पना माने, रणजीत गावडे, प्रकाश मोरे, विवेक घाडगे, प्रशांत चिटणीस, राजेंद्र चव्हाण, शिवाजी राणे, आनंदराव जाधव यांनी मनोगत केली.

अॅड. सर्जेराव खोत यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश अलोक आराध्य यांनी कोल्हापूरला भेट देण्याबाबत संमती दिली आहे. याकडे लक्ष वेधत नव्या कार्यकारिणीने त्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. सचिव मनोज पाटील यांनी गट विचारात न घेता प्रामाणिकपणे काम करेल असा विश्वास दिला. उपाध्यक्ष तुकाराम पाडेकर यांनी ज्येष्ठ वकिलांच्या मार्गदर्शनानुसार काम करू असे आश्वासित केले. नूतन अध्यक्ष विजय पाटील यांनी गेल्या वर्षभरामध्ये सक्रियपणे पुढे नेण्यात आलेला खंडपीठाचा लढा असाच पुढे चालू ठेवू. सर्वांनी सर्किट बेंच स्थापन होणे बाबत एकत्रित प्रयत्न करू असा विश्वास दिला. अॅड. निशिकांत पाटोळे यांनी स्वागत केले. अॅड. राजू ओतारी यांनी आभार मानले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes