Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
सुप्रीमच्या आदेशाचे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांना संधी मिळणारअंबाबाई मंदिर विकास आराखडा १४४५ कोटीचा, जोतिबा विकास आरखडयासाठी २५९ कोटीचाबार असोसिएशनमध्ये गटतट न आणता खंडपीठाचा लढा यशस्वी करू – नूतन पदाधिकारी-कार्यकारिणीकडे पदभार सुपूर्दस्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या, सुप्रीम कोर्टाचा आदेशटॉप वीस शिक्षकांमध्ये पदवीधर शिक्षिका अर्चना सुतार, कविता सरदेसाई !कुशिरेच्या ज्योती चव्हाणचे बारावी परीक्षेत लख्खं यशबारावी परीक्षेत विवेकानंद कॉलेजच्या गुणवत्तेची परंपरा कायमगोखले कॉलेजचा बारावीत विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्केप्रशासनाची अॅक्शन, प्रदीप हुपरे निलंबित ! सदाशिव येजरेंचा कबुलीनामा !!शिवाजी विद्यापीठासाठी नव्या कुलगुरू निवडीच्या प्रक्रियेला सुरुवात, शोध समितीसाठी नावांची शिफारस

जाहिरात

 

महाराष्ट्र गौरव रथ २५ एप्रिलला कोल्हापूर जिल्ह्यात- जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील

schedule20 Apr 25 person by visibility 114 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार )पक्षातर्फे महाराष्ट्र दिनानिमित्त संयुक्त महाराष्ट्र गौरव रथाचे आयोजन केले आहे. राज्यातील विविध भागातून  हे गौरव रथ तीस एप्रिल २०२५ रोजी मुंबईत दाखल होतील. आणि एक मे रोजी मुंबईत गौरव रथ निघणार आहे. दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातून २५ एप्रिल रोजी गौरव रथ काढण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक मार्केट यार्ड येथील पक्ष कार्यालयात झाली. या बैठकीत मंत्री मुश्रीफ यांनी, पश्चिम महाराष्ट्रातील गौरव रथाची सुरुवात पन्हाळा येथून होणार आहे. या गौरव रथमध्ये जिल्ह्यातील तीन हजारहून अधिक कार्यकर्ते सहभागी होतील या पद्धतीने नियोजन करण्याच्या सूचना दिल्या. दरम्यान जिल्ह्यातून निघणाऱ्या गौरव रथविषयी जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर म्हणाले, ‘पन्हाळा येथे २५ एप्रिल रोजी सकाळी ८. ३०  वाजता महाराष्ट्र गौरव रथाला प्रारंभ होईल.पन्हाळा येथून हा गौरव रथ प्रयाग चिखली येथे येईल. नदी संगमावर कलश पूजन होणार आहे. प्रयाग चिखली येथून हा रथ कोल्हापूरकडे रवाना होईल. राजर्षी शाहू समाधीस्थळ येथे अभिवादन करण्यात येईल.

दसरा चौक मार्गे हा रथ बिंदू चौकात दाखल होईल. येथील महात्मा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास अभिवादन केले जाईल. यानंतर शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे. यानंतर हा रथ माणगावकडे रवाना होईल. माणगाव परिषदेच्या ठिकाणाहून हा रथ जयसिंगपूरमार्गे सांगलीकडे रवाना होणार आहे. ’

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes