पत्रकार समीर देशपांडे यांना सरपंच परिषदेचा राज्यस्तरीय पुरस्कार
schedule20 Apr 26 person by visibility 50 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापुरातील वरिष्ठ पत्रकार समीर सुधाकर देशपांडे यांना सरपंच परिषद महाराष्ट्र यांच्यावतीने समाजभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. सरपंच परिषदेचे राज्य अध्यक्ष दत्ताभाऊ काकडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. गुरूवारी 30 एप्रिल 2026 रोजी सकाळी ११.३० वाजता पुणे येथील यशदा प्रशिक्षण संस्थेमध्ये विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, आमदार श्रीकांत भारतीय, आणि पदमश्री पोपटराव पवार यांच्या उपस्थितीमध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे. देशपांडे हे गेली ३० वर्षे पत्रकारितेमध्ये असून त्यांनी ग्रामविकासाबाबत सातत्याने लेखन केले आहे. ग्रामविकास क्षेत्रातील अनेक राज्यस्तरीय बातम्यांचा परिणामही झाला आहे. राज्य सरकारच्या पत्रकारांसाठीच्या कोल्हापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कार्यरत असलेल्या अधिस्वीकृती विभागीय समितीचे ते अध्यक्ष आहेत. विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कामही उभे केले आहे. ते मुळचे आजरा तालुक्यातील चिमणे येथील आहेत.