Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा महारक्तदान संकल्पसाहस की तुम मिसाल बनो, जीवन मे चमकते रहो ! पोलीस उपायुक्त कृष्णात पिंगळेंचा सत्कार!!शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर प्राचार्य आर. आर. कुंभार, अभिजीत कापसे! स्थायी समितीवर पृथ्वीराज पाटील, आठ जण अधिकार मंडळ !!सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये सृष्टी मोफत वंध्यत्व सल्ला केंद्र, पालकमंत्र्याच्या हस्ते लोकार्पणनाइट कॉलेजच्या खेळाडूची जर्मनीतील स्पर्धेसाठी निवड, विद्यापीठातर्फे शुभेच्छाशिवाजी विद्यापीठ-डीवाय पाटील संस्थेत शिक्षण-आरोग्य क्षेत्रातील संशोधनासंबंधी करारसरकारकडून परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नावाखाली ब्राह्मण समाजाची फसवणूककॉलेजमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींच्या स्वागताचा हटके कार्यक्रम, चार दिवसीय इंडक्शन प्रोग्रामशक्तीपीठ महामार्गच्या समर्थनार्थ शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात, सहापट दराची मागणीदेसाई - मोरे कुटुंबातील नवीन पिढी पृथ्वीच्या माध्यमातून समाज - राजकारणात

जाहिरात

 

शक्तीपीठ महामार्गच्या समर्थनार्थ शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात, सहापट दराची मागणी

schedule19 Jul 25 person by visibility 184 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गच्या समर्थनार्थ कोल्हापुरात शनिवारी (१९ जुलै २०२५) शेतकऱ्यांनी सातबारा उतारा हाती घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आमचा शक्तीपीठ महामार्गला पाठिंबा असल्याचे निवेदन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना दिले. तसेच काही बाधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे सातबारा जमा केले. यावेळी बाधित शेतकऱ्यांनी, शक्तीपीठ महामार्गसाठी जाणाऱ्या जागेला बाजारभावापेक्षा सहा पट अधिक दर द्यावा अशी मागणी केली. आमदार राजेश क्षीरसागर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण उपस्थित होते.

‘शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे, शक्तीपीठ महामार्गला आमचा पाठिंबा, शक्तीपीठ महामार्ग विकासाचा मार्ग’अशा मजकुराचे फलक आणि घोषणा देत बाधित शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले. यामध्ये जिल्ह्यातील सहा तालुक्यातील ३०० हून अधिक बाधित शेतकऱ्यांचा समावेश असल्याचे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देताना बाधित शेतकऱ्यांनी ‘शक्तीपीठ महामार्गला आमचा पाठिंबा आहे. शक्तीपीठ महामार्गमुळे जिल्हयाच्या विकासाला गती मिळणार आहे. जिल्ह्यातील वंचित भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात येईल.’असे सांगितले.

 शिरोळ तालुक्यातील कोथळी, दानोळी, निमशिरगाव या गावातून सचिन लंबे, सतीश माणगावे, वसंत पिसे, चंद्रकांत माने, महिला शेतकरी म्हणून वासंती हराळे रुक्मिणी माने, नीता पाटील आणि सविता आदींनी  यांनी आपले सातबारा जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे दिला. कोल्हापूर जिल्हा समर्थक शेतकरी समिती अध्यक्ष प्रा. दौलतराव जाधव, माजी महापौर राजू शिंगाडे, कमलाकर जगदाळे, नवनाथ पाटील,  आनंदा धनगर,  भीमराव कोतकर, हातकणंगले तालुक्यातील अमोल मगदूम, धनपाल आळते, अनिल पाटील, रोहित बांदर, राजू जमादार, प्रभाकर हेरवाडे, सूर्यकांत चव्हाण गारगोटी राम अकोलकर, मेघन पंडित, दत्ता पाटील, जयसिंग पाटील, सुरेश पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.

……………….

‘शक्तीपीठ महामार्गवरुन विरोधी मंडळी फक्त विरोधाचे  राजकारण करत आहेत. शक्तीपीठ महामार्ग हा विकासाचा प्रकल्प ठरणारा आहे. विकास प्रकल्पाना राजकारणातून विरोध होऊ नये. शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे. बाधित शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या संदर्भात सरकारशी बोलू. शेतकऱ्यांच्या जमिनीला अधिकाधिक दर मिळावा यासाठी प्रयत्नशील राहूल.’

-राजेश क्षीरसागर, आमदार

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes