Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरातील कवी - लेखक - प्राध्यापक – शिक्षक एकवटले, शनिवारी करणार धरणे आंदोलन ! जंतरमंतरवरील तरुणांचे वाढविणार मनोबल!शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारी निर्देशाकांत कोल्हापूर देशात द्वितीय स्थानावरभारतीय मजदूर संघाचा ७२ वा वर्धापनदिन  साजरा,शिवसाई मंडळाची विद्यार्थी दत्तक योजना होतकरू मुलांच्या स्वप्नांना बळ देणारी - डॉ. संपत खिलारी महिला नव्या तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रगतीशील शेतकरी बनतील - शौमिका महाडिक४१० दूध संस्थेविषयी शौमिका महाडिकांचे प्रेम हे पुतना मावशीचे, सभासदांचे पत्रकविद्यार्थ्यांवरील लाठीमाराच्या निषेधार्थ कोल्हापुरात वंचित - डाव्या आघाडीची रॅलीकोल्हापुरात आंदोलनांचे जंतर-मंतर ! भाजप - काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर, प्रचंड घोषणाबाजी ! !गडहिंग्लजमधील आरटीई २५ टक्के प्रवेशातील  अनियमिततेची चौकशी; त्रिसदस्यीय समिती नियुक्तखोट्याला संरक्षण द्यायच्या नावाखाली नेत्यांनी खऱ्यांवर अन्याय करू नये : सुधीर मसवेकर

जाहिरात

 

भारतीय मजदूर संघाचा ७२ वा वर्धापनदिन  साजरा,

schedule24 Jul 26 person by visibility 95 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : भारतीय मजदूर संघाच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त भारतीय मजदूर संघ कार्यालय, कोल्हापूर येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष सचिन मेंगाळे यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले.
मेंगाळे म्हणाले "भारतीय मजदूर संघाची ७२ वर्षांची वाटचाल ही केवळ वेतनवाढीसाठीचा संघर्ष नसून राष्ट्रनिर्मितीमध्ये कामगारांना सन्मानाचे स्थान मिळवून देणारा प्रवास आहे. आज उद्योग क्षेत्रात कंत्राटीकरण, कृत्रिम बुद्धिमत्ता, चार नवीन कामगार संहितांमुळे  अनेक आव्हाने उभी राहिली आहेत. 'सुधारणा स्वीकारू, पण कामगारांच्या हक्कांच्या किंमतीवर नाही' ही आमची स्पष्ट भूमिका आहे. किमान वेतन नव्हे, तर जीवननिर्वाह वेतन हा कामगारांचा अधिकार आहे.’

 कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह विजय जोशी म्हणाले,‘ भारतीय विचारांची कामगार संघटना तयार करणे या आधारावरच भारतीय मजदूर संघाची स्थापना करण्यात आली व आजपर्यंत कार्यरत राहिली तसेच देशाच्या, उद्योगाच्या व कामगारांच्या हक्कांसाठी लढत आलेबद्दल विशेष धन्यवाद मानले तसेच हक्कांसोबतच कर्तव्याची जाणीव महत्त्वपूर्ण असेल तरच समाजाची खऱ्या अर्थाने प्रगती होईल. प्रारंभी, अनुजा धरणगावकर यांनी श्रमिक गीत सादर केले.  जिल्हा संघटन मंत्री शिवाजी मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रविण जाधव यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र एडके यांनी आभार मानले. याप्रसंगी ज्योती तावरे, अमर लोहार, राहुल भालबर, मुकुंद जोशी, एस. एन. पाटील, भगवान खाडे , अमॄत लोहार , तेजस मडिवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी,  वीज उद्योग व वीज कंत्राटी कामगार, आशा कर्मचारी व अंगणवाडी सेविका, घरेलू, घाटगे पाटील उद्योग समूह कामगार, ज्येष्ठ नागरिक संघ व परिवहन उद्योग कामगार,  बॅक कर्मचारी संघ - पंचगंगा नागरी सहकारी बँक कर्मचारी उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes