Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जिल्हा परिषदेत यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनएलआयसीचे निवृत्त अधिकारी नंदकुमार जाधव यांचे निधन हरिप्रिया एक्स्प्रेसमधील कमी केलेल्या प्रवासी डब्यांची संख्या पूर्ववत करा- परिवहन समिती सभापती सत्यजित जाधव ॲक्शन मोडवर, वर्कशॉपची केली पाहणी डीवाय पाटील अभियांत्रिकीच्या  माजी विद्यार्थ्याचे यूपीएससीमध्ये यशमहापालिकेसमोर काँग्रेसचे आंदोलन, भाजपच्या मंत्र्यांनी दिली प्रश्नांच्या सोडवणुकीची ग्वाहीकोल्हापुरात शनिवारी - रविवारी कंदमुळांचा महोत्सवसतेज पाटलांशी हातमिळवणी ही तर अफवाच, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष महायुतीचाच - हसन मुश्रीफ एकनिष्ठेचे फळ ! गोल्डनमॅनच्या चिरंजीवला मिळाली सभापतिपदाची संधी ! !गोकुळमधील बोगस सभासदांना दिलासा नाही-प्रकाश बेलवाडेंची माहिती

जाहिरात

 

गोकुळमधील बोगस सभासदांना दिलासा नाही-प्रकाश बेलवाडेंची माहिती

schedule12 Mar 26 person by visibility 154 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या बोगस सभासदांना सुप्रीम कोर्टाकडून कोणताही दिलासा मिळाला नाही. मंत्री हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेी याचिका केवळ चाळीस सेकंदात सुप्रीममध्ये फेटाळली आहे. असे प्रकाश बेलवाडे यांनी सांगितले. दुसरीकडे मुश्रीफ यांचे वकील आनंद लांडगे यांनी, त्या सभासदांसंबंधी मंत्री हसन मुश्रीफ यांनी दाखल केलेल्या याचिकेतील मुद्दे विचारात घ्यावेत. सर्किट बेंचमध्ये सतरा मार्चला यासंबंधीची सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे.

बेलवाडे यांनी म्हटले आहे,‘ गोकुळ मध्ये ११०८ सभासदांवर तत्कालीन दुग्ध विकास विभागाने अवसायनात काढण्याची प्रक्रिया सुरु केली होती. त्याच वेळी २१२ सभासद संस्थांवर दूध पुरवठा खंडित झाल्याने अवसायन प्रक्रिया सुरु झाली होती. तसेच ४७५ सभासद संस्थांची नोंदणी अगोदरच रद्द झाली होती. ही प्रक्रिया बेकायदेशीर पद्धतीने मंत्री मुश्रीफ यांनी कोणतीही संविधानिक प्रक्रिया पार न पाडता स्थगित केली. याविरुद्ध महादेव सहकारी दूध व्यावसायिक वडकशिवाले यांनी हायकोर्टात  याचिका दाखल करत त्या बेकायदेशीर स्थगिती उठवून प्रक्रिया पार पार पाडावी पाडावी म्हणून याचिका सादर केली. सात मार्च रोजी झालेल्या सुनावणीत सरकारने वेळ मागितल्यावर दहा मार्च रोजी पुन्हा सुनावनी झाली. आणि अजून एकदा वेळ मागून पुढील सुनावणी सतरा मार्च रोजी ठेवली होती. असे असताना मंत्री हसन मुश्रीफ यांनी  सर्वोच्च न्यायालयात ही सुनावनी लावली. अवघ्या 40 सेकंदात सर्वोच्च न्यायालयाने सदर याचिका फेटाळली. शेवटी विजय सत्याचा होतो. न्यायालयात सत्य चालते. त्यामुळे या सर्व बोगस सभासद संख्यांना वगळून ही निवडणूक घ्यावी म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. अभिलेख पाहता अनेक घोटाळे या सभासद नोंदणी प्रक्रियेमध्ये झाले आहेत हे दिसून येते.’

मंत्री मुश्रीफ यांचे वकील आनंद लांडगे यांनी म्हटले आहे,‘ मंत्री मुश्रीफ यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत चार मागण्या केल्या होत्या. यामध्ये ज्या संस्था अवसायात निघालेल्या आहेत  त्यांना याप्रकरणात प्रतिवादी केले नाही.  तेव्हा त्या संस्थांना प्रतिवादी करत न्याय मागण्याची संधी उपलब्ध करुन दिली पाहिजे. तसेच निवडणूक प्राधिकरणला प्रतिवादी केली नाही. अनेक संस्थांनी एका महिन्याच्या आत आपली माहिती सहायक निबंधक दुग्ध विभागाला सादर केली आहे. त्या संबंधीचा निकाल होऊन निवडणुकीचा कार्यक्रम सुरू करावा. या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने १७ मार्च रोजी होणाऱ्या सर्किट बेंचसमोरच्या सुनावणीप्रसंगी मंत्री मुश्रीफ यांनी जे मुद्दे मांडले आहेत, ते विचारात घ्यावेत असा आदेश दिला आहे.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes