Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केएमटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी ! नगरविकासचा आदेश !!तिरुपती बालाजी येथे महाराष्ट्र सदन स्थापन करा, राजेश क्षीरसागरांची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणीबदली टप्पा क्रमांक सहामधील शिक्षकांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा २१ ऑगस्टपासून कोल्हापुरात  बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजनसहाय्यक प्राध्यापक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत लवकरच प्रक्रिया-मंत्री चंद्रकांत पाटील न्यू वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नेत्ररोग तपासणी शिबिरकोल्हापुरात 19 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय वीज परिषद, वीज दरवाढीच्या विरोधात ठरणार आंदोलनाची दिशाकॉमर्स कॉलेजमध्ये डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरीगोकुळ करणार आईस्क्रिम अन् चीज निर्मिती ! गडहिंग्लजला उभारणार म्हैस विक्री केंद्र !!शिक्षक संघ थोरात गटाची कोल्हापूर शहर कार्यकारिणीची घोषणा

जाहिरात

 

कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूरच्या पर्यटकाचा मृतदेह सापडला

schedule28 Jun 25 person by visibility 655 categoryगुन्हे

  महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : वर्षा पर्यटनासाठी आंबोली येथील कावळेसाद परिसरात गेलेल्या जिल्हा परिषद कर्मचारी राजेंद्र बाळासाहेब सनगर यांचा मृतदेह शनिवारी सापडला. कावळेसाद दरीत  दोनशे फूट खोल अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला. एनडीआरएफचे पथक व गेळे ग्रामस्थांच्या मदतीने त्यांचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आला.
सनगर हे शुक्रवारी मित्रांच्या सोबत वर्षा पर्यटनासाठी आंबोली येथे गेले होते. जिल्हा परिषदेतील आठ कर्मचारी व इतर मित्र मिळून असे चौदा जण सोबत होते . शुक्रवारी ते कावळेसाद पॉईंट येथे फिरत असताना  रेलिंग वरून पाय घसरला. पाय घसरून ते  दरीत पडले. शुक्रवारी संध्याकाळी त्यांची शोधाशोध करण्यात आली. दाट धुके , अंधार यामुळे बचाव कार्यात अडथळे येत होते. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी शोधकार्य थांबवले होते. शनिवारी सकाळी पुन्हा शोध कार्याला सुरुवात झाली. एनडीआरएफचे पथक व गेळे ग्रामस्थ यांच्या मदतीने शोध मोहीम राबवली. दरीत दोनशे फूट अंतरावर त्यांचा मृतदेह आढळला. दरम्यान सनगर यांचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त कळताच कोल्हापुरातून त्यांच्या मित्रपरिवाराने तिकडे धाव घेतली.

राजेंद्र सनगर हे जिल्हा परिषदेतील पशुसंवर्धन विभागात कनिष्ठ लिपिक होते. या महिन्यातच त्यांची करवीर पंचायत समितीमध्ये शिक्षण विभागात बदली झाली होती. दरम्यान त्यांचे पार्थिव शनिवारी (२८ जून) सायंकाळी ६.३० वाजता चिले कॉलनी येथील निवासस्थानी आण्ण्यात येणार आहे. त्यानंतर पंचगंगा स्मशानभूमी येथे अंत्यविधी केले जाणार आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes