Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केएमटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या धर्तीवर सुधारित वेतनश्रेणी ! नगरविकासचा आदेश !!तिरुपती बालाजी येथे महाराष्ट्र सदन स्थापन करा, राजेश क्षीरसागरांची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणीबदली टप्पा क्रमांक सहामधील शिक्षकांना शाळांचा प्राधान्यक्रम नोंदविण्याची सुविधा २१ ऑगस्टपासून कोल्हापुरात  बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजनसहाय्यक प्राध्यापक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीबाबत लवकरच प्रक्रिया-मंत्री चंद्रकांत पाटील न्यू वूमेन्स कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये नेत्ररोग तपासणी शिबिरकोल्हापुरात 19 ऑगस्ट रोजी राज्यस्तरीय वीज परिषद, वीज दरवाढीच्या विरोधात ठरणार आंदोलनाची दिशाकॉमर्स कॉलेजमध्ये डॉ. रंगनाथन यांची जयंती साजरीगोकुळ करणार आईस्क्रिम अन् चीज निर्मिती ! गडहिंग्लजला उभारणार म्हैस विक्री केंद्र !!शिक्षक संघ थोरात गटाची कोल्हापूर शहर कार्यकारिणीची घोषणा

जाहिरात

 

भाजप करणार महापालिकेसाठी ४५ जागावर दावा, काँग्रेसने जिंकलेल्या जागेवर लक्ष !

schedule09 Aug 25 person by visibility 65 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिका, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून आम्ही सगळे एकत्र लढविणार आहोत. महायुती सरकारवरील लोकांचा विश्वास पाहिला की महापालिकेचा महापौर, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा महायुतीचा होईल याची खात्री आहे. दरम्यान कोल्हापूर महापालिका निवडणुकीत भाजपा ४५ जागावर दावा करणार आहे. असे खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपचा महापौर होईल असा दावाही त्यांनी केला.  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी आठ गावासह कोल्हापूर महापालिकेची हद्दवाढ होणार हे निश्चित असल्याचे त्यांनी सांगितले.

महाडिक म्हणाले ‘महापालिकेच्या गेल्या निवडणुकीत भाजप व ताराराणी आघाडीने ३३ जागा जिंकल्या होत्या. या ३३ जागांवर आमचा दावा भक्कम आहे. याशिवाय काँग्रेसने २९ जागा जिंकल्या होत्या. त्या जागांचे महायुतीमध्ये वाटप करताना २९ पैकी १२ जागा भाजपाला मिळाव्यात असा आमचा आग्रह राहील. भाजपने जिंकलेल्या ३३ आणि काँग्रेसने जिंकलेल्या जागापैकी बारा अशा एकूण ४५ जागा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ‘महायुतीमधील प्रत्येक पक्षाला आपला महापौर व्हावा असे वाटणे साहजिकच आहे. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत हे वरिष्ठ मंत्री आहेत. त्यांनी पक्षाच्या मेळाव्यात शिवसेनेचा महापौर होणार असे म्हणणे काही गैर नाही. शहरात शिवसेनेचे आमदार आहेत. आमदार राजेश क्षीरसागर ही जादा जागा मिळवण्यासाठी, जिंकण्यासाठी प्रयत्नशील करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने गेल्या निवडणुकीत १४-१५ जागा जिंकल्या होत्या.’

यंदा आम्ही शत-प्रतिशत भाजप म्हणून निवडणूक लढविणार आहोत. महायुतीच्या नेते मंडळींनी फॉर्म्युला निश्चित केला आहे. महायुती म्हणून आम्ही या निवडणुका ताकतीने लढवू आणि जिंकू. महापालिकेत महायुतीत सत्ता आणि भाजपचा महापौर होण्यात काही अडचणी वाटत नाहीत. ’असेही ते म्हणाले. नजीकच्या काळता भाजपमध्ये मोठया संख्येने प्रवेश होणार आहेत. असेही महाडिक यांनी सांगितले.  शाहू साखर कारखान्याचे प्रमुख् समरजितसिंह घाटगे हे भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे याकडे पत्रकारांनी लक्ष वेधल्यावर त्याविषयी मला काही माहिती नाही असे सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes