Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिका शाळेतील शिक्षकांच्या बदलीचा कार्यक्रम जाहीरगोकुळमध्ये शिवराज्याभिषेकदिन साजराकोल्हापुरात सोमवारी -मंगळवारी पाणी पुरवठा बंदमहावितरणच्या वीज प्रश्नांवर पालकमंत्र्यांचा सोमवारी ऊर्जा दरबारशारंगधर देशमुखांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट ! मेळावा घेऊन कोल्हापुरात होणार पक्षप्रवेश राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या पुण्यातील कार्यक्रमाला कोल्हापुरातून 5000 कार्यकर्ते जाणारचित्रकाराची शिवभक्ती, चित्रातून उलगडला शिवछत्रपतींचा इतिहास !जोतिबा मंदिर विकास आराखडा अंमलबजावणीसाठी सरकार पाठीशी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसग्रंथपाल - शारीरिक शिक्षण संचालकपदाच्या भरतीसाठी प्राचार्य असोसिशनने घेतली मंत्र्यांची भेटबीबीए, बीसीएसाठी पुन्हा प्रवेश परीक्षा होणार- मंत्री चंद्रकांत पाटील यांची अधिकाऱ्यांना सूचना

जाहिरात

 

राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या पुण्यातील कार्यक्रमाला कोल्हापुरातून 5000 कार्यकर्ते जाणार

schedule06 Jun 25 person by visibility 120 categoryराजकीय

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा 26 वा वर्धापनदिन 10 जून 2025 रोजी पुणे येथील बालेवाडी येथे होत आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला कोल्हापूर जिल्ह्यातून पाच हजार कार्यकर्ते जाणार आहेत. त्या अनुषंगाने नियोजन करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री व राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी दिल्या.
:  कसबा बावडा रोडवरी सर्किट हाऊस येथे राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनासंबंधी शुक्रवारी 6 जून रोजी बैठक झाली. या बैठकीत बालेवाडी येथे जाणाऱ्या कार्यक्रमासाठी नियोजन करण्यात आले तसेच तालुका निहाय किती कार्यकर्ते जाणार यासंबंधी ही माहिती घेण्यात आली. प्रत्येक तालुक्यातून जवळपास 15 चार चाकी वाहने, व जिल्ह्यातून एकूण 50 बसेसद्वारे पदाधिकारी व कार्यकर्ते वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
 माजी आमदार के पी पाटील, गोकुळचे चेअरमन नाविद मुश्रीफ, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष मानसिंगराव गायकवाड, गोकुळचे संचालक किसन चौगुले, रणजीत पाटील, युवराज पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैया माने, सुधीर देसाई, शिरोळ तालुक्यातील राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पाटील, हुतात्मा वारके सूतगिरणीचे चेअरमन उमेश भोईटे, भोगावती कारखान्याचे माजी चेअरमन धैर्यशील पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शितल फराकटे, शहराध्यक्षा जहिदा मुजावर, रेखा आवळे, बाजार समिती संचालक सूर्यकांत पाटील, करवीर तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष मधुकर जांभळे, इचलकरंजीचे अमित गाताडे, सुहास जांभळे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अनिल साळोखे आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी प्रत्येक तालुक्यासाठी किती बसेस आवश्यक आहेत किती कार्यकर्ते सहभागी होणार यासंबंधी नियोजन करण्यात आले. प्रत्येकावर जबाबदारी निश्चित केली. या बैठकीला बिद्री साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन मनोज फराकटे, गडहिंग्लज साखर कारखाना चे प्रकाश पताडे, , जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, पंडितराव केणे, सुनील सूर्यवंशी, प्रकाश गाडेकर, नितीन दिंडे, विकास पाटील, शेखर देसाई, माजी नगरसेवक परीक्षित पन्हाळकर, संदीप कवाळे सतीश लोळगे, प्रकाश कुंभार, सुहास साळोखे, रामेश्वर पत्की, सुनील गाताडे, बाळासाहेब पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes