नैसर्गिक न्यायतत्वाद्वारे त्या संस्थांनाही मतदानाचा अधिकार मिळावा -विकास पाटील कुरुकलीकर
schedule22 Aug 26 person by visibility 46 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : सुप्रीम कोर्टाने गोकुळ दूध् संघाशी संलग्नित अवसायनातील दूध संस्थांना पात्र ठरविले आहे. तेव्हा नैसर्गिक न्यायतत्वावर मतदानाचा अधिकार त्या दूध संस्थांना मिळायला हवा अशी मागणी प्राथमिक दूध उत्पादक संस्थांच्या प्रतिनिधींनी केली. सहायक निबंधक कृष्णा ठाकरे यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने ही विनंती केली. कागल तालुक्यातील विकास पाटील कुरुकलीकर, बिद्री साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन मनोज फराकटे यांच्यासह दूध उत्पादक संस्था प्रतिनिधींचा समावेश होता. ‘प्राथमिक दूध संस्था प्रतिनिधी गेली, पाच, सहा महिने लढा देत आहेत. सर्किट बेंच, हायकोर्ट, सुप्रीम कोर्टापर्यंत पाठपुरावा केला. अखेर सत्याचा विजय झाला. कोर्टाने, अवसायनातील संस्थांना पात्र करावे असे म्हटले आहे. यामुळे या संस्थांना मतदानाचा अधिकार मिळायला हवा. या संस्थांचा अंतिम मतदार यादीत समावेश करावा अशी मागणी केली.सभासद हा दूध उत्पादक आहे, यामुळे तो मतदानास पात्र ठरतो असेही प्रतिनिधी म्हणाले.