एअर इंडियाच्या विमानाचा अहमदाबादमध्ये अपघात, नागरी वस्तीत विमान कोसळले
schedule12 Jun 25 person by visibility 110 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गुजरातमधील अहमदाबादहून लंडनकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानाला गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. या विमानातू 252 प्रवासी प्रवास करत होते. इंजिनमध्ये बिघाड होऊन विमानाचा अपघात झाल्याचा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे. नागरी वस्तीत व रुग्णालयाच्या इमारतीवर विमान कोसळले. या अपघातामध्ये एकूण किती जण दगावले याची नेमकी आकडेवारी अजून उपलब्ध झाली नाही. प्रवाशांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
अहमदाबादहून लंडन गॅटविक विमानतळाकडे विमान निघाले होते. दुपारी एक वाजून सतरा मिनिटाला विमानाचे टेक ऑफ झाले. विमानात एकूण २४२ प्रवासी होते. यामध्ये दहा विमान कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या २३० मध्ये भारतीय प्रवासी १६९ तर इंग्लडचे ५२ प्रवासी, पोर्तुगालचे सात प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती प्राथमिक टप्प्यात समोर आली आहे. विमानाचे टेक ऑफ झाल्यानंतर काही मिनिटातच अपघात झाला. विमानाच्या दोन्ही इंधन टाक्या पूर्ण भरल्या होत्या. विमान नागरी वस्तीत कोसळताच मोठ आवाज झाला. आगीचे व धुराचे लोट पसरले. विमान ज्या इमारतीवर कोसळले, ती इमारत रुग्णालयाची आहे. अपघातातील प्रवाशांना वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अपघाताचे वृत्त समजताच घटनास्थळी मदत कार्य युद्धपातळीवर सुरु आहे. पोलिस प्रशासन, अग्निशमन दलाचे जवान, वैद्यकीय कर्मचारी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे अहमदाबादकडे रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे घटनेचा आढावा घेत आहेत.