Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
निकालानंतर कागलात वादाचे फटाके, मंडलिक-मुश्रीफ आमनेसामने !कोल्हापूरच्या चित्रकारांच्या कलाकृतीचे मुंबईत प्रदर्शनतुटलेली दोरी पुन्हा बांधता येते, मुश्रीफ यांच्या विधानावर सतेज पाटलांचे मिश्किल उत्तर देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभारांच्या पुण्यतिथीनिमित्त संविधान दौड, १२०० स्पर्धकांचा सहभाग राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 67 जणांनी मागितली उमेदवारी, 39 इच्छुकांच्या मुलाखती मुरगूडमध्ये मंडलिकच, कागल मुश्रीफ-समरजितचे, पन्हाळयाचा गड कोरेंचा, जयसिंगपुरात यड्रावकरच ! गडहिंग्लजमध्ये कोरे पराभूत, शिरोळमध्ये अशोक मानेंना झटका ! !शिवसेनेकडे उमेदवारांची तगडी फौज ! राष्ट्रवादीतही वाजतगाजत मुलाखती ! !भाषणबाजीत हरवला सिनेटमधील प्रश्नोत्तराचा तास ! मूळ विषयापेक्षा अवांतर चर्चा जास्त ! !सिनेट सदस्यांची विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर निदर्शनेमहायुतीचा फॉर्म्युला ठरला ? २९ डिंसेबरपर्यंत उमेदवारांची घोषणा !

जाहिरात

 

सरोज पाटील यांना रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार, २५ डिसेंबरला गडहिंग्लज येथे वितरण

schedule19 Dec 25 person by visibility 84 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विद्या प्रसारक मंडळ व जागृती हायस्कूल माजी विद्यार्थी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय रत्नमाला घाळी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २५ डिसेंबर रोजी नारीशक्ती पुरस्कार वितरण समारंभ आयोजित केला होता. यंदाचा, श्रीमती रत्नमाला घाळी नारीशक्ती पुरस्कार रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीच्या सदस्या व महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या जनरल सेक्रेटरी श्रीमती सरोज एन. पाटील यांना जाहीर झाला आहे.अशी माहिती विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. सतीश घाळी यांनी दिली. गडहिंग्लज येथील घाळी सांस्कृतिक सभागृह येथे २५ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वाजता पुरस्कार वितरण समारंभ होणार आहे. शैक्षणिक, सामाजिक, सहकार आणि स्त्रियांची उन्नती यासाठी विशेष कामगिरी करणाऱ्या उपक्रमशील महिलांना या पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. गडहिंग्लज तालुक्याचे माजी आमदार डॉ. एस. एस. घाळी यांच्या पत्नी श्रीमती रत्नमाला घाळी यांच्या नावे हा पुरस्कार दिला जातो. गडहिंग्लज तालुक्याच्या शैक्षणिक वाटचालीत घाळी कुटुंबियांचे मोठे योगदान आहे. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कार्याबद्दल दरवर्षी एका व्यक्तीला हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, मानपत्र व रोख २५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरुप आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले. पत्रकार परिषेदला अॅड बाबूराव भोसकी, किशोर हंजी, अॅड. विकास पाटील, अरविंद कित्तूरकर, शिवयोगी घाळी, प्राचार्य डॉ. दत्ता पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes