Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
केआयटीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजराशाहूवाडीत बिबटयाचा हल्ला, वृद्ध दाम्पत्यांचा मृत्यूसेंट्रल रेल्वेच्या विभागीय प्रवासी सल्लागार समिती सदस्यपदी आनंद मानेउद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी ब्रँड कोल्हापूरने निधी उभारावा-यशवंतराव थोरातगोकुळच्या व्यासपीठावरून काँग्रेसच्या आमदारांची मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महायुती सरकारवर टीकास्त्र, हा विषय न समजण्यासारखाथेट पाईपलाईनचे श्रेय घेता मग जबाबदारी का झटकता ? राजेश क्षीरसागरांचा सतेज पाटलांना पलटवारआता चौथी-सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा ! एकवेळची बाब म्हणून फेब्रुवारीत पाचवी-आठवीची परीक्षा !शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला बास्केटाबॉलल स्पर्धेत तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी मुलींच्या संघास विजेतेपदसावित्रीबाई फुले रुग्णालयातील अतिदक्षता विभाग नऊ दिवस बंदनोव्हेंबर महिन्यापासून मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा टप्पा तीन अभियान

जाहिरात

 

नोव्हेंबर महिन्यापासून मुख्यमंत्री माझी शाळा - सुंदर शाळा टप्पा तीन अभियान

schedule17 Oct 25 person by visibility 80 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांमध्ये शाळेप्रती उत्तरदायित्वाची भावना निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी प्रेरणादायी व आनंददायी वातावरण मिळावे या उद्देशाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा – टप्पा तीन हे अभियान तीन नोव्हेंबर ते ३१  डिसेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.


 जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या शाळांनी  अभियानात सहभागी होणे अपेक्षित आहे. या अभियानासाठी शाळांची विभागणी, शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशा दोन वर्गवारीत करण्यात येत आहे. २४ ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर  हा कालावधी अभियानाच्या पूर्व तयारीसाठी असून सर्व शाळांनी  या अभियानात सहभागी  होण्यासाठी  नोंदणी करावी. तीन नोव्हेंबर रोजी औपचारिक कार्यक्रमाद्वारे अभियानाची सुरुवात होवून अभियानाचा कालावधी ३१ डिसेंबर रोजी पूर्ण होईल. एक जानेवारी  ते सात फेब्रुवारी 2026 या कालावधीत मूल्यांकनाची  प्रक्रिया होईल. अभियानाचे स्वरुप पुढीलप्रमाणे आहे. यामध्ये पायाभूत सुविधा ३८ गुण, शासन ध्येय धोरण अंमलबजावणी १०१ गुण,  शैक्षणिक संपादणूक - ६१ गुण असे २०० गुणापैकी गुणांकन करण्यात येईल. सहभागी शाळांचे केंद्र, तालुका व जिल्हास्तरावर विविध समित्यांमार्फत मुल्यांकन केले जाईल. अशी माहिती जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes