Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
दिवाळीची खरेदी करुन घरी जाताना टेम्पोंची धडक, भाऊ-बहिणीसह पुतणी ठारकेआयटीमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजराशाहूवाडीत बिबटयाचा हल्ला, वृद्ध दाम्पत्यांचा मृत्यूसेंट्रल रेल्वेच्या विभागीय प्रवासी सल्लागार समिती सदस्यपदी आनंद मानेउद्योन्मुख खेळाडूंना प्रोत्साहित करण्यासाठी ब्रँड कोल्हापूरने निधी उभारावा-यशवंतराव थोरातगोकुळच्या व्यासपीठावरून काँग्रेसच्या आमदारांची मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये महायुती सरकारवर टीकास्त्र, हा विषय न समजण्यासारखाथेट पाईपलाईनचे श्रेय घेता मग जबाबदारी का झटकता ? राजेश क्षीरसागरांचा सतेज पाटलांना पलटवारआता चौथी-सातवीच्या वर्गासाठी शिष्यवृत्ती परीक्षा ! एकवेळची बाब म्हणून फेब्रुवारीत पाचवी-आठवीची परीक्षा !शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय महिला बास्केटाबॉलल स्पर्धेत तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी मुलींच्या संघास विजेतेपदसावित्रीबाई फुले रुग्णालयातील अतिदक्षता विभाग नऊ दिवस बंद

जाहिरात

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची जयसिंगपूरमध्ये सोळा ऑक्टोबरला ऊस परिषद

schedule14 Oct 25 person by visibility 114 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने १६ ॲाक्टोबर  2025 रोजी विक्रमसिंह क्रिडांगणावर २४ वी ऊस परिषद  होणार आहे. यावर्षी ऊसाला पहिली उचल किती घ्यायची व आंदोलनाची पुढील दिशा कोणती असणार हे या परिषदेमध्ये ठरणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. 
        गेल्या पंधरा दिवसापासून विविध भागामध्ये शेतकरी मेळावे , पदाधिकारी बैठका तसेच प्रसार माध्यमातून ऊस परिषदेची तयारी करण्यात आली आहे. विशेषता काटामारी , रिकव्हरी चोरी, तोडणी वाहतूक  व उपपदार्थामधून   साखर कारखानदार लुबाडणूक करू लागले आहेत. गेल्या पाच वर्षात एफ. आर. पी मध्ये ६५० रूपयाची वाढ झाली आहे मात्र ऊसाचा दर ३ हजार ते ३२०० पर्यंत स्थिर राहिलेला आहे. खते ,बि -बियाणे, किटकनाशके , मजूरी यामध्ये भरमसाठ वाढ झाल्याने  उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. 
      राज्य सरकार व साखर संघ एक रक्कमी एफ. आर. पी. मध्ये मोडतोड करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना पहिली उचल २५०० रूपये व मराठवाडा विदर्भातील शेतक-यांना २ हजार ते २२०० रूपये पहिली उचल मिळणार असून यामुळे मोठा फटका ऊस उत्पादक शेतक-यांना बसणार आहे. या सर्व मुद्यांमुळे यंदाची ऊस परिषद जोरदार होणार असल्याची माहिती  मोरे यांनी दिली. 
    यावेळी जिल्हाध्यक्ष अजित पोवार , डॅा. बाळासाहेब पाटील , डॅा. महावीर अक्कोळे , आणणासो चौगुले , रामचंद्र फुलारे,  सुभाष शेट्टी , सचिन शिंदे , तानाजी वठारे , बंडू चौगुले , शंकर नाळे , बंडू पाटील , विक्रम पाटील , नितेश कोगनोळे , कुमार सुतार , श्रीकांत पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes