Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणास सुरुवात, पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊनची समस्याकिसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सागर कोंडेकरनेर्लीत सतेज - ऋतु बैलगाडी शर्यतीचा थरार, सरपंच राजा-आरएक्स बैज्या बैलजोडीने जिंकले मैदान वीरशैव लिंगायत दीपस्तंभ पुरस्कारांनी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा मरणोत्तर सन्मानराजारामपुरीतून रॅली, कार्यकर्त्यांच्या घोषणा अन् जल्लोषी स्वागत ! विजय जाधव यांचा कार्यालय प्रवेश !!चंदेरी आठवणींना उजाळा देत प्रभात फिल्म कंपनीचा वर्धापनदिन साजराबाजार समितीच्या ५५ माजी संचालकांना नोटीस, जिल्हा सहकार उपनिबंधकांची कार्यवाहीगोकुळच्या ठेवीत १९० कोटींची वाढ, दूध संकलनातही वाढ-योगेश गोडबोलेवीज कंत्राटी कामगार संघाची पुण्यात बैठक ! तर ३० जूनपासून राज्यव्यापी आंदोलन !! लिंगायत माळी समाज कोल्हापूरतर्फे नऊ जूनला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जाहिरात

 

वीज कंत्राटी कामगार संघाची पुण्यात बैठक ! तर ३० जूनपासून राज्यव्यापी आंदोलन !!

schedule01 Jun 25 person by visibility 302 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीची बैठक पुण्यातील विश्वकर्मा भवन येथे पार पडली. या बैठकीला राज्यभरातील २८ जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. कामगारांच्या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर ३० जून २०२५ पासून राज्यव्यापी आंदोलन करू असा इशारा दिलाा.  दरम्यान भारतीय मजदूर संघाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त 'कंत्राटी कामगार संदेश यात्रा' देशभरात राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत विविध क्षेत्रांतील कंत्राटी कामगारांशी थेट संपर्क साधून मेळावे व संवाद सत्र होणार आहेत.

या बैठकीत महावितरणच्या मानव संसाधन विभागाचे संचालक राजेंद्र पवार यांनी कामगारांच्या अडचणी ऐकून घेतल्या. याप्रसंगी त्यांनी, "वीज कंपनीच्या उन्नतीमध्ये कंत्राटी कामगारांचा मोठा वाटा असून, कंत्राटदारांकडून त्यांना होणाऱ्या अन्यायातून मुक्त करण्यासाठी महावितरणकडून ठोस पावले उचलण्यात येतील," असे आश्वासन दिले. बैठकीत भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र व गोवा प्रभारी  सि. वि. राजेशज यांची उपस्थिती होती.

संघाचे प्रदेश अध्यक्ष निलेश खरात यांनी “ऑगस्ट २०२४ मध्ये सध्याचे मुख्यमंत्री व तत्कालिन ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४२ हजार कंत्राटी वीज कामगारांसाठी जाहीर केलेले लाभ अजून प्रत्यक्ष अंमलात आलेले नाहीत. प्रशासनाने अद्याप त्या निर्णयांची अंमलबजावणी न केल्यामुळे शेवटच्या कामगारापर्यंत लाभ पोहोचलेले नाहीत. प्रशासन आर्थिक हितसंबंधांमुळे दोषी कंत्राटदारांना पाठीशी घालत आहे का?" असा प्रश्न केला. या बैठकीत कर्मचारी राज्य विमा योजनेंतर्गत वेतन मर्यादेत वाढ करून अधिक कामगारांना या योजनेचा लाभ मिळावा. वीज क्षेत्रातील कामगारांसाठी, हे काम धोकादायक उद्योग म्हणून घोषित करून स्वतंत्र वेतन अधिनियमांतर्गत विशेष सुरक्षा लाभ त्वरित लागू करावेत अशा मागण्यांचा ठराव करण्यात आला.

संघाचे प्रदेश सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी, ‘कामगारांच्या मागण्यांकडे सरकारने गांभीर्याने लक्ष दिले नाही, तर येत्या 30 जूनपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनादरम्यान राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल.’प्रदेश कोषाध्यक्ष सागर पवार यांनी आभार मानले. या बैठकीसाठी कोल्हापुरातून संघटनेचे केंद्रीय कार्याध्यक्ष अमर लोहार, प्रादेशिक विभाग पुणे संघटकमंत्री विजय कांबळे, जिल्हाध्यक्ष राहुल भालबर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes