Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
वरिष्ठ निवड श्रेणी प्रशिक्षणास सुरुवात, पहिल्याच दिवशी सर्व्हर डाऊनची समस्याकिसान काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी सागर कोंडेकरनेर्लीत सतेज - ऋतु बैलगाडी शर्यतीचा थरार, सरपंच राजा-आरएक्स बैज्या बैलजोडीने जिंकले मैदान वीरशैव लिंगायत दीपस्तंभ पुरस्कारांनी देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार यांचा मरणोत्तर सन्मानराजारामपुरीतून रॅली, कार्यकर्त्यांच्या घोषणा अन् जल्लोषी स्वागत ! विजय जाधव यांचा कार्यालय प्रवेश !!चंदेरी आठवणींना उजाळा देत प्रभात फिल्म कंपनीचा वर्धापनदिन साजराबाजार समितीच्या ५५ माजी संचालकांना नोटीस, जिल्हा सहकार उपनिबंधकांची कार्यवाहीगोकुळच्या ठेवीत १९० कोटींची वाढ, दूध संकलनातही वाढ-योगेश गोडबोलेवीज कंत्राटी कामगार संघाची पुण्यात बैठक ! तर ३० जूनपासून राज्यव्यापी आंदोलन !! लिंगायत माळी समाज कोल्हापूरतर्फे नऊ जूनला गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जाहिरात

 

 कोल्हापूर जिल्ह्यातील २५१ गावांना ७६ कोटी मंजूर

schedule31 May 25 person by visibility 76 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्य सरकारच्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेतून खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी ७६ कोटी ८० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही योजना कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवली जावी, यासाठी  राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी पाठपुरावा केला. लवकरच या निधीअंतर्गत प्रत्यक्ष विकास कामांना प्रारंभ होईल, असे खासदार महाडिक यांनी सांगितले.

 निधी मंजूर केल्याबद्दल खासदार महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यासह राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आभार मानले आहेत. राज्याच्या नागरी आणि ग्रामीण भागातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकांच्या वस्तीमध्ये मूलभूत सुविधा देण्यासाठी या निधीचा विनियोग होणार आहे. ग्रामीण भागातील अनेक ग्रामपंचायतींचे विज बिल थकीत आहे. पुरेसे उत्पन्न  नसल्याने, अनेक ग्रामपंचायती विज बिल भरणा करू शकत नाहीत. त्याचा परिणाम जनजीवनावर आणि अनेक विकास योजनांवर होतो. अशा वेळी राज्य सरकारकडून मिळालेल्या निधीमुळे अनेक ग्रामपंचायतींना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच ग्रामीण भागातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांचा विकास करणे, वाचनालय, अभ्यासिका, धम्म केंद्र, प्रशिक्षण केंद्र अशा कामांसाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाने भरघोस निधी दिला आहे. त्याचा कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे २५१ गावांना फायदा होणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes