विद्यार्थ्यांनी समाजपयोगी संशोधनाचा ध्यास घ्यावा :कुलगुरू अरुण पाटील
schedule04 Jan 22 person by visibility 361 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :
‘सध्या संशोधन क्षेत्रात शोधनिबंध प्रसिद्धीवर जास्त भर दिला जातो व एकदा का ते शोधनिबंध प्रसिद्ध झाले की संशोधन कागदावरच राहते.त्यामुळे विद्यार्थ्यांचे संशोधन हे समाजपयोगी असायला हवे. आपल्या संशोधनाला व्यापार व व्यवसायपूरकता आणण्यासाठी विद्यापीठातील शिक्षक व विद्यार्थ्यांनी इंडस्ट्रीला लागणारे कुशल तंत्रज्ञान अवगत करणे गरजेचे आहे तरच इंडस्ट्री आणि विद्यापीठामध्ये समतोल साधला येईल’ असे प्रतिपादन संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या सीएफसी अंतर्गत आयोजित कार्यशाळेच्या उदघाटनप्रसंगी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी.शिर्के, आय सी टी, मुंबईचे कुलगुरू डॉ.अनिरुद्ध पंडित, एनआयटीचे माजी अधिष्ठाता प्रो. एस.के.चक्रवर्ती, कार्यशाळेचे समन्वयक व प्रा.डॉ.सोनवणे, डॉ.ज्योती जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
कुलगुरू शिर्के म्हणाले ‘विद्यापीठातील या सीएफसी सेंटरचा उपयोग फक्त विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी होणार नसून हे सेंटर भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी व औद्योगिक क्षेत्रासाठी सुद्धा खुले आहे. ’
या कार्यशाळेत एनसीएल पुणेचे शास्त्रज्ञ डॉ. पंकज पोदार, पार्क सिस्टीमचे शास्त्रज्ञ डॉ. आशुतोष वलवडे, कस्टमर सपोर्ट मॅनेजर डॉ.तुषार भावसार यांनी विद्यार्थ्यांना अटॉमीक फोर्स मायक्रोस्कोपी बद्दल मार्गदर्शन केले. सैफचे संचालक प्रा.डॉ.आर.जी.सोनकवडे यांनी प्रास्ताविक केले.